Savitribai Phule Mahila Ekatma Samaj Mandal
Donate
Back
Blog
हा केवळ ‘अहवाल’ नाही..
तुमच्या सदिच्छा, देणग्या, समयदान, मार्गदर्शन आणि सावित्रीबाई फुले मंडळाचे प्रयत्न यांच्यामुळे २०२२-२३ या वर्षात काय साध्य होऊ शकलं याचा हा बोलका दस्तऐवज आहे!
प्रस्तुत आहे- सावित्रीबाई फुले मंडळाच्या २०२२-२३ च्या वार्षिक अहवालाचा एक ट्रेलर, सोबतच्या व्हिडीयोत.
पीडीएफ फ्लिपबुक स्वरूपात हा संपूर्ण अहवाल आपल्याला इथं उपलब्ध आहे-
https://shorturl.at/n0168
तुमच्या सूचनांचे स्वागत!
धन्यवाद.
Video Link:- https://www.facebook.com/spmesmandal/videos/689213776119066/
उपेक्षित वस्त्यातील मुले शाळेत जातात खरे पण तरीही त्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी पूरक उपक्रमांची गरज भासतेच.
अशा १० उपेक्षित वस्त्यांतील इयत्ता ५ वी ते १० वी च्या मुलांच्या शैक्षणिक अडचणी लक्षात घेऊन सावित्रीबाई फुले मंडळाने कॅनपॅक इंडिया प्रा. लि. यांच्या सहकार्याने सिद्धार्थ विद्यार्थी विकास प्रकल्प मागील दोन वर्षांपासून चालवला आहे. मुलांना शालेय अभ्यासक्रम सोप्या पद्धतीने शिकवणे, त्यांची अभ्यासातील रुची वाढवणे याला प्राधान्य दिले जाते. यातील एक प्रयोग- या वस्त्यांवरील वर्गांत डिजिटल शिक्षण- आता सुरू केलेलं आहे, त्याचा हा व्हिडीयो.
पूरक उपक्रमातून शिक्षणाची गोडी वाढवणे, गुणवत्ता सुधारणे यात मंडळ विविध प्रकल्पांद्वारे सक्रीय आहे.
Video Link:- https://fb.watch/neuCQtLSHt/
सातपुड्याच्या कुशीतील वनवासी बांधवांचा आरोग्याचा प्रश्न नेहमी ऐरणीवर असतो व त्यावर उत्तर शोधण्यासाठी सावित्रीबाई फुले मंडळालासुद्धा मागे कसे राहता येईल?
मंडळाने नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील १२ पाड्यांमध्ये माता कणिकंसारी प्रकल्पाच्या माध्यमातून महिलांच्या आरोग्यविषयक कामाची सुरवात केलीय. हिमोग्लोबीन व मायक्रोन्यूट्रीरएंट चे संतुलन राखण्यासाठी काम केले जाते. या मध्ये अन्न हेच औषध यानुसार तेथील स्थानिक पारंपारिक ज्ञान व उपलब्ध संसाधनांचाच वापर करून वर्षभर पुरेल अशा १५ प्रकारच्या भाज्यांची परसबाग निमिर्ती केली जाते. पावसाळ्यात रानात उगवणाऱ्या रानभाज्यांचा पारंपरिक पद्धतीने आहारात समावेश करून त्यांच्या औषधी गुणधर्मांचे ज्ञान पुढील पिढीत पोहचविणे हा उद्देश ठेवून दर वर्षी वनभाजी महोत्सव प्रत्येक पाड्यात घेण्यात येतो. गेल्या २ वर्षांत प्राज फाउंडेशन च्या पाठबळाने मंडळाने ७५० परस बागा तयार केल्या आहेत.
“जहाँ सोते हुये दिन गुजरे बेसुमार मेरे,
उन्ही सड़कों पे चमकते हैं इश्तेहार मेरे.. !”
(मनोज मुंतशीर)
अशीच आश्चर्यकारक कहाणी आहे उज्ज्वला म्हस्के यांची. २०१५ मध्ये त्यांना सावित्रीबाई फुले मंडळाच्या ब्यूटीशियन कोर्सच्या रुपाने स्व- उन्नतीची किल्ली गवसली!
त्यांच्या आयुष्यात या प्रशिक्षणामुळे झालेला बदल त्यांचाच शब्दात:
“बिकट परिस्थितीमुळे माझे ७ वी नंतर पुढील शिक्षण थांबले. अनेक अडचणी होत्या. पण २०१५ मध्ये मी सावित्रीबाई फुले मंडळाचा बेसिक ब्युटीशीयन कोर्स केला व त्यानंतर मी मंडळाच्या सहकार्यानेच माझे प्रिया ब्युटी पार्लर सुरू केले. त्याने माझी स्वतःची एक ओळख तयार झाली. यातून गेल्या ८-९ वर्षांत मी ३५ ते ४० लाख रुपये स्वबळावर कमवले आहेत! त्यातूनच मी प्लॉट घेऊन घरही बांधले. माझ्या आयुष्यात जो बदल झालाय याचे सर्व श्रेय मी सावित्रीबाई फुले मंडळाला देते”
उज्ज्वलाताईंचे अभिनंदन करतानाच या सर्व परिवर्तनाचे श्रेय आम्ही कौशल्य प्रशिक्षणाच्या आमच्या सर्व पूर्व व विद्यमान प्रायोजकांना नम्रपणे देऊ इच्छितो!
“बस चलते रहना है,
सीखना है, आगे बढ़ना है।
मंजिल रुकनेसे मिलेगी नहीं,
बस तू आगे बढ़ तो सही।”
संजयनगर उपेक्षित वस्तीतील कावेरी. वडिलांच्या आकस्मिक निधनानंतर घराची जबाबदारी तिच्यावर येऊन पडली. आता काय करायचं हा मोठाच प्रश्न तिच्या समोर आला.
पण सावित्रीबाई फुले मंडळाच्या संगणक प्रज्ञा प्रकल्पाची तिला माहिती होती. तिने त्वरीत तिथे प्रवेश घेतला. उत्तम संगणक प्रशिक्षण घेऊन नोकरी मिळवण्याची तिची इच्छा प्रकल्पामुळे पूर्ण झाली. याबरोबरच संभाषण कौशल्य आणि उद्योजकतेच धडे सुद्धा मिळाले. प्रशिक्षणानंतर आत्मविश्वास वाढलेल्या कावेरीने शासकीय सेवेची तयारी केली आणि यश सुद्धा मिळवले. संगणकाच्या ज्ञानामुळे तिची संगणक आॅपरेटर व लिपिक पदासाठी निवड झाली. परिवाराचा ती आधार बनली. सेवावस्तीतील अशा अनेक मेहनती मुलांचं करीयर घडवण्यात २००२ पासून हा प्रकल्प मदत करीत आहे.
संगणक प्रज्ञा प्रकल्पाला आर्थिक पाठबळ देणाऱ्या Protean eGov Technologies व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान या सहयोगी संस्थांचे आभार!
शेतकरी उत्पादक कंपन्या (FPO) या केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या प्रकल्पामुळे छोट्या शेतकऱ्यांचा खूप फायदा होतो आहे.
नाबार्ड च्या मार्गदर्शनाखाली सावित्रीबाई फुले मंडळाने गेल्या कांही वर्षांत महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, नांदेड, जळगांव व नागपूर जिल्ह्यांत एकूण ३० शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन केल्या आहेत. शेतमाल प्रक्रिया, विक्री केंद्र, शेतकी सहायता केंद्र आदी विविध व्यवसायांत या कंपन्यांच्या माध्यमातून हजारो शेतकरी उतरले आहेत.
आमच्या कंपन्यांपैकी एक- छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड परिसरातील अर्दिका कंपनीचे संचालक कारभारी मनगटे यांना यावर्षीच्या दिल्लीतील स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय सोहळ्याचे विशेष निमंत्रण मिळाले व सपत्निक या सोहळ्यात होण्याचा त्यांना सन्मान मिळाला. ७६० छोटे शेतकरी अर्दिका कंपनीचे भागधारक आहेत.
मनगटेंच्या रुपाने सर्व शेतकरी कंपन्यांचा सन्मान झाल्याची शेतकऱ्यांची भावना आहे.
We can’t spell success without U!
त्यामुळंच सावित्रीबाई फुले मंडळाच्या वाटचालीतील प्रत्येक महत्त्वपूर्ण गोष्टी आपल्याला आम्ही सांगतो. मंडळाच्या कामाबद्दलची ताजी चित्रफीत आज आपल्याला पाठवत आहे. मंडळाच्या पाठीशी समर्थपणे आपण उभे आहात. त्यामुळे या प्रगतीचं श्रेयही आपलं आहे! आपल्या सूचनांचे स्वागत.
धन्यवाद!
Video Link:- https://youtu.be/1Q--ZR-5Yrc
अगर फ़ुर्सत मिले पानी की तहरीरों को पढ़ लेना,
हर इक दरिया हज़ारों साल का अफ़्साना लिखता है
(बशीर बद्र)
धाराशीव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील बराचसा भाग तसा पाणीटंचाईचा भाग समजला जातो. गेल्या कांही वर्षांपासून सावित्रीबाई फुले मंडळ या भागात शाश्वत जलस्त्रोत विकासाचे प्रकल्प सातत्याने राबवत आहे.
या तालुक्यातील उळूप गावात यावर्षीच्या उन्हाळ्यात मंडळाने काम पूर्ण केलं आणि त्याचे चांगले परिणाम दिसायलाही सुरु झाले.
उळूप गावच्या छोट्या शेतकऱ्यांना वाढत्या पाण्याच्या शक्यता दिसल्यामुळे त्यांनी नवनवे प्रयोग हाती घेतले आहेत. मच्छिंद्र वराळे यांनी त्यांची ड्रॅगनफ्रूटची लागवड अजून वाढवली. या सर्व प्रयोगांतून शाश्वत शेती व अधिक उत्पन्नाकडे सर्वजण जातील हे नक्की.
शेतीसाठी पाण्याची उपलब्धी ही विकासाची किल्ली आहे. या प्रकल्पातील आमचे सहयोगी प्राज फाऊंडेशन चे धन्यवाद कारण ही गोष्ट ओळखून त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला.
सावित्रीबाई फुले मंडळाची औपचारिकरित्या स्थापना पण झालेली नव्हती त्या काळात, सुमारे ३४ वर्षांपूर्वी, आमच्या स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी शहरातील उपेक्षित वस्त्यांतील विद्यार्थ्यांसह एका प्रकल्पाची सुरुवात केली. पुढे त्याचं विद्यार्थी विकास प्रकल्प असं नामकरणही झालं. तेंव्हापासून आजपर्यंत निरंतरपणे शेकडो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वैशिष्ट्यपूर्ण सकारात्मक बदल घटवून आणणारा हा प्रकल्प. सावित्रीबाई फुले मंडळाचा सर्वांत जुना आणि अत्यंत प्रभावी प्रकल्प! तीन वस्त्यांतील विद्यार्थ्यांसाठी दररोज सायंकाळी तीन तास शैक्षणिक गुणवत्ता वाढ, व्यक्तिमत्त्व विकास आणि समाजभान देणारा प्रकल्प. यातील सर्वांत सुंदर गोष्ट म्हणजे दहावी पास झाल्यानंतर यातील विद्यार्थी याच प्रकल्पाचे स्वयंसेवी कार्यकर्ते म्हणून वेळ देतात.
या छोट्या व्हिडीयोत त्याची कांही वैशिष्ट्ये दिलीयत.
तुम्हाला या प्रकल्पाला भेट देऊन या उत्साही विद्यार्थ्यांना भेटायला नक्कीच आवडेल!
Video Link:- https://www.facebook.com/reel/262065439910017
ABOUT
About Us
Our Team
Awards
Testimonials
Contact Us
GET INVOLVED
Projects
Campaigns
Events
Volunteer
Collaborate
INFORMATION
Gallery
News Media
Success Stories
Newsletter
Digital Documents
Reports
Copyright© 2021-22. SPMES Mandal. All Rights Reserved.
Terms and Conditions | Refund and Cancellation | Privacy Policy
Powered By